Ad will apear here
Next
आत्मदीपो भव
‘आत्तदीपो भव’ म्हणजेच ‘आपणच व्हावे आपला दिवा’ ही शिकवण गौतम बुद्धांनी जगाला दिली, याचा आधार घेत गोव्यातील व्यावसायिक दत्ता दामोदर नायक यांनी प्रगत विचार व विकासासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तिमत्त्व विचार व्यवस्थापनशास्त्र या विषयीचे आधुनिक विचार ‘आत्मदीपो भव’तून व्यक्त केले आहेत.

संस्कारक्षम वयातील विद्यार्थी आणि व्यवस्थापनशास्त्राचा गंध नसलेल्या वाचकांसाठी हे पुस्तक सुलभ व सोप्या भाषेत लिहिले आहे. कष्टाविना, घाम गाळल्याशिवाय, बुद्धीचा वापर केल्याशिवाय श्रीमंत, सुखसंपन्न जीवनाकडे नेणारा कोणताही जादूचा दिवा नसतो, हे वास्तव यातून विविध कथांमधून ठसविले आहे. कोणावरही विसंबून राहू नये, नियती, दैव, विधिलिखित या गोष्टींवर विश्वास न ठेवता यश मिळवण्यासाठी प्रयत्नवाद, नियोजन, जटील प्रश्न सोडविण्यासाठी मानसिक ताकद व उत्तम प्रतिकारशक्ती, योग्य आहार, व्यायामाने तयार केलेले सुदृढ शरीर, प्रफुल्लित मनोवृत्ती, आशावादी व सकारात्मक दृष्टीकोन कसा असावा, याची सूत्रे गोष्टरूपाने व प्रत्यक्षातील घटनांचे उदाहरणे देऊन सांगितली आहेत.

पुस्तक : आत्मदीपो भव
लेखक : दत्ता नायक
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पाने : १६४
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSZBV
Similar Posts
मनोविकास प्रकाशनतर्फे २९ जूनला चर्चासत्राचे आयोजन पुणे : ‘अर्थरचनेतील समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणाऱ्या अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, २९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता टिळक रस्त्यावरील पद्मजी सभागृहात होईल,’ अशी माहिती ‘मनोविकास’चे संस्थापक अरविंद पाटकर यांनी दिली
‘कुतूहल हरवता कामा नये’ पुणे : ‘अनेक विषयांचे मला प्रचंड कुतूहल वाटते. त्यात मी झोकून देतो. तो अभ्यास पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आणतो. साठच्या दशकात मी बंडखोरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकले. पाश्चात्त्य संस्कृतीविषयी पुस्तके लिहिताना तिथल्या संगीताविषयी लिहायचे ठरवले होते. त्यामुळेच ‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ हे पुस्तक लिहिले
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित
‘केवळ ‘जीडीपी’ वाढायला हवा असे म्हणणे मूर्खपणाचे’ पुणे : संपूर्ण देशातील उत्पादनाचे अंतिम मूल्य म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी); मात्र यात विषमतेचा विचारच होताना दिसत नाही. जीडीपी वाढला, तर रोजगार वाढेल परिस्थिती सुधारेल हे साफ खोटे ठरत असून, आजही ६० ते ७० टक्के जनता ही दहा हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक शुल्कात आपला परिवार चालवते. दहा टक्के जीडीपी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language